Thursday, November 22, 2007

हो भारत माझा देश आहे


ते पाकिस्तानी राष्ट्र अराजकता वादी राष्ट्र म्हणून ख्याती प्राप्त आहे . भारतात आतंक पसरवण्याचे काम ते सतत करत असतात .. ते कितीही नाही म्हणाले तरी हे सत्य आहे . झिया -उल -हक
, बेनझीर भुत्तो , नवाज शरीफ किव्वा परवेज मुशर्रफ असोत .. या सर्व नेत्यांनी नेहमीच भारता विरोधी कारवाया आणि भाषणे केली आहेत . पाकिस्तान चे PTV ta भारत विरोधी प्रसार करण्यासाठी च वाहिलेले आहे . पाकिस्तानी नेते सतत 2/3 तास भारता विरुद्ध भाषणे देत असतात आणि भारताच्या policies कशा चुकीच्या आहेत हे आपल्या लोकांच्या मनावर बिंबवत असतात . आपण मात्र भाषण करताना minority च्या भावनांचा विचार करतो .. अर्थात गरजणारे बरसणार नाहीत असे आमचे नेते सांगत असले तरी या गर्जना 1 अनामिक भीती उत्पन्न करतात ..याचा संबंध मग भारतीय कर -दाते कारगिल , संसदे वरील हल्ला , मुंबई bomb blast , विमान अपहरण , मुंबई वरील दहशतवादी हल्ला या सगळ्या शी लावू लागतो .

आपण परंपरा संस्कृती जपतोय ..अजून पर्यंत देश च्या सीमेवर धिंगाणा घालणाऱ्या दुष्मनाला तिथेच नामोहरम करण्या ऐवजी आपण तो आपल्या घराची बेल कधी वाजवतोय याची वाट पाहत बसलो होतो . संसद भावना वरील हल्ला , मुंबई वरील हल्ला म्हणजे कहर झाला .

मित्रानो आपणच चुकतोय ..हो ..नाहीतर काय हिम्मत होती या देशाची जो भारताच्या मेहेरबानी वर स्वतंत्र झाला त्याची भारता कडे मान वर करून पाहण्याची ..अरे भारत हा 1 मोठा लोकशाही असलेला देश आहे ..हजारोंच्या संखेने आम्ही नेते निवडून दले आहेत ..मग ?

देश सांभाळ न्या साठी ज्यांना नेते बनवले ते जर फ़क़्त खुर्ची सांभाळण्यासाठी आणि आपले bank balance करोडोंच्या घरात नेण्यासाठी धडपडणार असतील तर उद्या हेच पाकिस्तानी तुमच्या घरात राहायला येतील . आपल्याच देशात फिरताना लागणारे सुरक्षा रक्षकांचे कोंडले या आमच्या नेत्यांनी सीमेवर धाडले आणि केलेल्या घोत्याल्या मधील करोडोंची रक्कम सरकारजमा केली तरच या देशाचे भले होईल ..

प्रश्न हा उरतो कि मी काय करू शकतो ?..

मी पुढील election ला त्या वेळी चांगल्या वाटण्यार्या माणसाला निवडून आणू शकतो ..आणि म्हणू शकतो भारत माझा देश आहे सारे भारतीय ...

No comments: