हल्लीच एका नाटकात एक वाक्य ऐकले "आठवणीना हि एक expiry date असते " . खरय काळाच्या ओघात आठवणी हि पुसट होत जातात .. बऱ्या.. वाईट . ..घरात गेलेल्यांचे फोटो टांगून त्यांच्या आठवणी ताज्या ठेवण्याचा प्रकार त्यामुळेच सुरु झाला असावा .
.
त्याचा फोटो नाहीय माझ्याकडे पण आठवण अजून ताजी आहे . आज हि त्याची आठवण आली कि डोळे पाणावतात . त्याच्या बरोबर घालवलेला सर्व काळ डोळ्यासमोर उभा राहतो . अशी काही माणसे भेटतात कि ज्यांच्याशी आपला कधीच संबंध आलेला नसतो , पण जेव्हा येतो तेव्हा तो कायम टिकतो .. आणि एक दिवस अचानक ती माणसे तुम्हाला सोडून जातात .. परत न येण्या साठी ..
..
''कमलाकांत केळुस्कर ' आमच्या साठी K. D.
हा माणूस आमच्यातून निघून गेला त्याला ६ वर्षे होऊन गेली . खरतर माझे लग्नही झालेले नव्हते तेव्हा त्याला तीन मुले होती , एवढा आमच्यात वयाचा फरक होता . पण तो कधीच जाणवला नाही .
आम्ही एकाच कंपनी त काम करायचो . माझ्या सर्व समवयस्क मित्रांमध्ये KD अगदी फिट बसला होता . अनेक चुकीच्या गोष्टी तो जाणूनबुजून सतत करायचा पण करू नको म्हटल्यावर ऐकेल तो KD नव्हेच .. अगदी कंपनी ने दिलेली working bag कामाचा कंटाळा आला म्हणून त्याने सर्व समक्ष कचऱ्याच्या डब्यात फेकून दिली होती .. नंतर आम्हीच ती बाहेर काढून घेतली एका भिकाऱ्या कडून .. असा तो . Union leader असल्याने त्याच्या नावाचा तसा दबदबा असे आणि आम्ही सर्व तें त्याचे शागीर्द . कालांतराने आमच्या union मध्ये union president ची जागा रिकामी झाली आणि त्या जागी माझी नेमणूक झाली ..हे सारे KD च्या आग्रहा खातर ..मला तर union च्या कामातले काही काळात हि नव्हते पण KD ने सॉलिड confidence दिला ..Union च्या मिटींग्स च्या निमित्ताने माझे KD च्या घरी येणे जाणे सुरु झाले . त्यांची मुले त्याची बायको यांच्याशी हि ओळख झाली . स्वताच्या घरी हि KD तसाच होता जसा बाहेर ..प्रेमळ .
हळू हळू माझे KD च्या घरी जाणे हे मला मी माझ्या घरी असल्यागत वाटू लागले होते . आमच्या ऑफिस ची सर्व खलबते त्याच्या घरीच घडत असत . माझे बाकी सर्व मित्रही असत . एक आपुलकीचे नाते निर्माण झाले होते . union मिटींग्स च्या संदर्भात अनेकदा कलकत्ता येथे जावे लागे . KD अगदी मनापासून माझी काळजी घेत असे त्या अनोळखी शहरात. दारू पिताना मात्र तो मला म्हणे कि ' उगाच तुला प्रेसिडेंट बनवले .. कंपनी दारू देते आणि तू पीत नाहीस..सगळी फुकट जाते '. त्याची आणखी एक मजेदार आठवण म्हणजे जेव्हा जगात गणपती दूध पीत होते अशी अफवा उठली तेव्हा आम्ही कलकत्त्यात होतो. मिटिंग मध्ये असताना अचानक एक बंगाली धावत आला व ओरडला " गणेश ठाकूर दूध खोबे " .. मिटिंग तत्काळ बंद करवून चमत्कार पाहायला बाहेर धावणारा पहिला माणूस KD होता. आम्ही हि धावलो .. एका देवळा बाहेर प्रचंड रंग लागली होती ..आत जाणे शक्य नव्हते . KD ने आईडिया केली .. खिशातून एक छोटा कॅमेरा काढला व जोरात ओरडू लागला " प्रेस प्रेस .... प्रेस फ्रॉम मुंबई .. हट जाव हट जाव " २/३ फ्लाशेस उडवले ..आणि चमत्कार घडला ..त्या सर्व बंगाली नि KD ला पुढे जाऊ दिले .. त्याच्या मागे अर्थात मी . बाहेर येवून आम्ही पोट धरून हसलो होतो.
KD खूप दारू प्यायचा ..जी मिळेल ती प्यायचा पण अतिशय control मध्ये असायचा ..मी हि अनेकदा त्याला त्या विषयी बोललो पण no hopes .. शिवाय त्याच्या इतर गुणांकडे पाहता मग या गोष्टींकडे आम्ही हि डोळेझाक करायचो . .
त्याच्या मुलांसाठी मी शशांक दादा होतो तर त्याच्या बायकोला मी वहिनी म्हणायचो . वहिनी हि एक अत्यंत प्रेमळ बाई होती . KD च्या अनेक चुका तिने आजवर माफ केल्या होत्या . त्याचे दारू पिणे , स्मोकिंग हे तिलाही मान्य नवते पण सांगून उपयोग नव्हताच ..कारण तो KD होता . 'तू एकदा समजाव त्याला तू त्याच्या जवळचा आहेस न ' मला सांगे पण अखेर उपयोग होत नसे .. मग मी तरी किती वेळा सांगणार . KD चा मित्र परिवार अफाट होता . दिवसात कोणत्याही वेळी ट्रेन ने जाताना त्याला ट्रेन मध्ये एकतरी ओळखीचा माणूस भेटायचाच आणि KD ला तो त्याच्या सर्व family history सह माहित असायचा .. एखादे काम अडले तर आम्ही सरळ KD कडे धाव घ्यायचो आणि त्याच्या कडे त्याचे solution असायचे . अनेक लोकांना तो out of the way जाऊन मदत करायचा . माझे नाटकात काम करणे हे माझ्या घरच्यांना कधीच आवडले नाही पण KD family ला त्याचे फार कौतुक होते . इतरान पेक्षा माझ्यावर त्याचे पूर्ण घर जरा जास्तच प्रेम करे . माझ्या लग्नात ऑफिस ला दांडी मारून पत्रिका वाटत माझ्या बरोबर फिरला होता ..वाहिनी तर जाम खुश होती ..अगदी तिच्या घरचेच लग्न होते न ..
लग्नाच्या काही महिने आधी मी job बदलला तेव्हा KD रडला होता ..त्या एवढ्या मोठ्या माणसाला समजावताना मग माझ्या नाकीनऊ आले होते . ज्या दिवशी मी job सोडला त्या रात्री समुद्र किनार्यावर बसून तो एकटाच दारू प्यायला होता ..आणि हे हि मला नंतर KD नेच सांगितले .
आता आमचे भेटणे कमी झाले असले तरी फोन वर बोलणे सुरु असे . "आता कंपनीत मजा नाही रे " असे सतत सांगायचा आणि परत बोलवायचा .. पण एकदा कंपनी सोडून गेलेल्या Union President ला private कंपन्या परत घेत नसतात . त्याच्या घरी कधी कधी वहिनी फोन वर यायची म्हणायची कि ' कंपनी सोडल्या पासून तुझे प्रेम आट्लेय. हल्ली येत नाहीस . मुले , KD सतत आठवण काढतात . ये वेळ काढून ' मीही मग एक दिवस यायचे आश्वासन द्यायचो पण आता नवीन कंपनीत कामाची वेगळी पद्धत असल्याने वेळ मिळायचा नाही ..
लग्ना नंतर हळू हळू भेटणे तर दूरच पण फोन करणे हि कमी झाले . KD ने हि कंपनी सोडली मध्यंतरी च्या काळात , आता तो full fledge LIC agency करायचा . कधी फोन केला तर घरी हि भेटायचा नाही . वहिनीशी, मुलांशी जुजबी बोलणे होत असे .. आमच्यातली मैत्री कमी झाली होती असे नाही पण अनेक वर्षे एकत्र काढल्याने असेल किंवा आमच्यात नवीन काही संवाद घडत नसल्याने असेल .. एक अनामिक दुरावा मात्र जाणवू लागला होता .. दरम्यानच्या काळात KD चे दारू पिणे वाढले होते म्हणे ..
*********
***********
*************
****************
एका दुपारी एका मित्राचा फोन आला "Bad news.. अरे आपला KD गेला ". मी गप्प आहे हे पाहून तोच पुढे म्हणाला "काल रात्री दारू पिऊन bike चालवताना पडला आणि त्याचा हात fracture झाला होता .. DR म्हणाले उद्या सकाळी bandadge करू .. आता admitt व्हा व झोपा.. वहिनींना म्हणाले तुम्ही जा आता आणि सकाळी या साहेबाना चहा घेवून .. वाहिनी सकाळी ८ वाजता चहा घेवून गेल्या तेव्हा हा DR बरोबर गप्पा मारत होता .. सर्वांचा चहा झाल्यावर DR ने वहिनींना bandadge साठी लागणाऱ्या सामानाची लिस्ट दिली व खाली chemist कडे पाठवले ..
वहिनी समान घेवून आल्या तेव्हा KD गेला होता ... siviour heart attack '
मी अजून हि गप्पच होतो . ' तू coroner court मध्ये ये , मी हि पोहोचतोय '.
मी coroner court मध्ये पोहोचलो तेव्हा काही अनोळखी माणसे तिथे उभी होती ..मी आत वाकून पाहिले ... एवढा शांत KD आज पहिल्यांदा पाहत होतो .. वाटले शक्य च नाही . .आता हा माणूस उठणार आणि म्हणणार चुतीया बनवले तुम्हाला ...काश ..
जमलेल्या लोकांसमोर शो नको म्हणून तिथेच एका बाजूला गपचूप उभा राहिलो .. रडलोच नाही ..
काही च तासात सर्व सोपोस्कार आटोपले आणि आमचा KD काळाच्या पडद्या आड आणि भिंतीवरल्या फोटोत निघून गेला .
त्या दिवशी KD च्या घरा बाहेर उभा राहून मी वहिनींना रडताना ऐकत होतो .. घरात खूप गर्दी होती .. माझी मात्र त्यांच्या समोर जायची हिम्मत होत नव्हती .. त्या वेळी मी त्यांच्या समोर गेलो नाहीय तो आजतागायत .
मी जायला हवे होते . नंतर मी कधी फोन हि केला नाही .. कधीच .. आठवणी चा वहिनींना त्रास होईल अशी स्वता :चीच समजूत घालत बसलो ..
अजून दिवसभरात एकदातरी मला KD आठवतोच . त्याच्या bike सारखी bike कुठे दिसली तरी KD चा भास होतो . त्याच्या सारखी दिसणारी माणसे हि कुठे न कुठे दिसतात आणि पुन्हा सर्व आठवते .. पूर्ण casett rewind होते ....
मी त्या कुटुंबाला निदान moral support द्यायला हवा होता आणि या न त्या कारणाने मी तो देणे टाळले .. ती हि माझी एक जबाबदारी होती याचा मी कधी विचार केला नाही आणि हि सल आयुष्यभर राहणार .. आज देवाच्या दयेने त्यांचे उत्तम चालले आहे .. पण मी मात्र वाईट वागलो ..
KD I AM SORRY यार..
No comments:
Post a Comment